Ticker

6/recent/ticker-posts

रात्री 10 वाजता पत्रकारांना वेळ देणारे पहिलेच जिल्हाधिकारी – कीर्ती किरण एच. पुजार यांचे धाराशिवमध्ये उत्साहात स्वागत


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:सकाळी रत्नागिरीहून तब्बल 10 तासांचा प्रदीर्घ प्रवास करून आलेले धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पुजार यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर रात्री 10 वाजता धाराशिव येथे आगमन केले. इतक्या उशिरा असूनही त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना वेळ देऊन संवाद साधला. त्यांच्या या मुक्त आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वत्र गौरव होत आहे.

धाराशिव येथील पत्रकाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी त्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी पुजार यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत पत्रकार बंधूंच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी जुबेर शेख,आकाश नरोटे,सलीम पठाण,जफर शेख,कुंदन शिंदे,कैलास चौधरी,राम थोरात,अहमद अन्सारी,मनोज जाधव,वाहेद शेख आणि रमण आगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

लोकहितासाठी प्रभावी प्रशासनाची अपेक्षा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील प्रशासन लोकहितासाठी प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास पत्रकारांनी व्यक्त केला. इतक्या उशिरा आल्यानंतरही पत्रकारांना वेळ देणारे पहिलेच जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांच्या संवेदनशील कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशासन आणि माध्यमांमध्ये उत्तम समन्वय राहून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सकारात्मक पाऊले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या