Ticker

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनाम्यांची मागणी — संभाजी सेनेचे तहसील कार्यालयाला निवेदन

 

प्रतिनिधी : अशोक गरड 

औसा — औसा तालुक्यात गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी व नुकसानग्रस्त शेतजमिनींचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने तहसील कार्यालय, औसा येथे निवेदन सादर करण्यात आले.


संभाजी सेनेचे जिल्हा कार्यकर्ते विलास लंगर, धर्मराज पवार, राजकुमार साळुंखे, मोहन तात्या माळी, मनोज गरड, गणेश तिकडे, सचिन यादव, नागेश कसबे, आशिष गोदमे आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


निवेदनात नमूद करण्यात आले की, “गेल्या 19 दिवसांपासून पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून उभी पिके खराब झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजूनही प्रशासनाकडून पंचनाम्यांची कार्यवाही सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.”


यावेळी तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करून पंचनामे त्वरित करण्याची व शासनाकडून तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.


संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या