प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव व बार्शी तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाघाची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा घाट परिसरात वाघ असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, त्या ठिकाणी वाघाचे ताजे पायाचे ठसे आढळून आले आहेत.मध्यमा मार्फत अशी बातमी आल्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फेब्रुवारी महिन्यानंतर अचानक गायब झालेला वाघ नेमका कुठे गेला याचा तपास वनविभागाला लागला नव्हता. मात्र काही महिन्यांपूर्वी बार्शी तालुक्यातील एका गावांमध्ये गायीवर हल्ला झाल्याची घडली होती.त्या घटनेनंतर वाघाच्या हालचाली तेथे असल्याचे संकेत मिळाले होते. त्या ठिकाणाहून तो येडशीच्या दिशेने जाण्याऐवजी तुळजापूर तालुक्यात आला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, अजूनपर्यंत वाघाने कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला केलेला नसल्याने तो नक्की कुठे आहे, याबाबत वनविभाग अद्याप अनभिज्ञ आहे.
दरम्यान,पहिल्यांदाच मागील काही महिन्यांपूर्वी वाघाचे आगमन होताच धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पण वनविभागाकडून वाघ पकडण्यात यश येत नसल्याने समजताच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वनविभागाच्या निष्काळजीपणावर सडकून टीका केली होती. त्यांनी विविध पातळ्यांवर आंदोलन उभारले होते. विशेष म्हणजे, या निष्क्रियतेचा निषेध नोंदवण्यासाठी वनमंत्र्यांना ‘गाढव भेट’ देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे त्या वेळी वनविभागाला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पण आचाणक पणे वाघ गायब झाल्यानंतर पुण्याहून आलेली रेस्क्यू टीमही या दरम्यान परतली. मात्र वाघ पुन्हा दिसेनासे झाल्याने कारवाई ही अपूर्णच राहिली. आता पुन्हा एकदा वाघाची उपस्थिती निश्चित झाल्याने वनविभागाच्या हालचालींना वेग येणार का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
समाजसेवक मनोज जाधव यांनी थेट इशारा देत म्हणाले आहेत की,“जर वाघाने मानवी जीवावर हल्ला केला किंवा हिंसक वळण घेतले, तर यासाठी वनविभाग जबाबदार असेल. अशा वेळी पूर्वसूचना न देता आम्ही जिल्हाधिकारीमार्फत वनमंत्र्यांना गाढव भेट देऊ,” असा थेट इशारा मनोज जाधव यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. आता वनविभाग हा वाघ जेरबंद करणार की पुन्हा एकदा समाजसेवकांनी स्थगित केलेले गाढव भेट आंदोलन प्रत्यक्षात येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या