प्रतिनिधी : अशोक गरड
मासुर्डी (ता. औसा, जि. लातूर) येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अंतर्गत श्रीराम प्रभू महाराज भजनी मंडळ मासुर्डी शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर, वारकरी मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ म्हेत्रे, तालुकाध्यक्ष भगवान गोरे, संपर्कप्रमुख आत्माराम मिटकले, तालुका कोषाध्यक्ष शुक्राचार्य साळुंखे यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
या सोहळ्यात शाखाप्रमुख ह. भ. प. ओमप्रकाश दगडू सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाखेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्ष सुमनबाई किसनराव पाटील, सचिव सखुबाई शंकर गिरी यांच्यासह सुमनताई काळे, सीताबाई लोखंडे, उमाबाई सूर्यवंशी, दगडू सोमवंशी, तारामती सोमवंशी, विजयाबाई पिंपरी, बालाजी पाटील, शिवशंकर काळे, इंदुबाई गव्हाणे, महानंदा स्वामी, कौशल्याबाई पाटील, द्रोपदी शेळके, भागाबाई शेळके, उमाबाई पाटील यांचीही कार्यकारिणीत निवड झाली आहे.
कार्यक्रमात कीर्तनकार श्रीनिवास राऊत सर यांच्या कीर्तनाने वातावरण भारावून गेले. भाविकांची उपस्थिती, टाळ-मृदुंगाचा गजर आणि भक्तिरसात न्हालेलं वातावरण या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवत होते.
या कार्यक्रमामुळे मासुर्डी गावात वारकरी संप्रदायाच्या कार्यास अधिक बळ मिळणार असून अध्यात्मिक उन्नतीस चालना मिळणार आहे. भजनी मंडळाच्या या शाखेच्या उद्घाटनामुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या