Ticker

6/recent/ticker-posts

घाटातील घाण पाण्याच्या समस्येवर तातडीने कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्पर योगदान:तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या पाठपुरावाला यश

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर :तुळजाभवानी मंदिर परिसरात रोज हजारो भाविक, महिलावर्ग आणि शेतकरी बांधव दर्शनासाठी येत असतात. यामध्ये घाट परिसरातील रस्त्यावर साचलेले घाण पाणी व रस्त्यावर पडलेली खडी ही मोठी समस्या बनली होती. यामुळे अनेक वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार वाढले होते.


काल या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूरचे आवळे यांच्याशी तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी संपर्क साधून सदर घाण आणि खडी रस्त्यावरून तातडीने हटवण्याची विनंती करण्यात आली होती.


या विनंतीला मान देत आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करत घाटातील घाण काढण्याचे काम सुरू केले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वीपणे सुरू झाले आहे.


या कार्याबद्दल शिंदे गट शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख दत्तोबा बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश काका चिवचिवे, शेतकरी सेना प्रमुख गणेश नेपते तसेच सर्व शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.


तुळजापूर शहरात भाविकांचे व स्थानिक नागरिकांचे सुरक्षेच्या दृष्टीने हे काम अतिशय महत्त्वाचे असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयामुळे या प्रश्नाचे समाधान शक्य झाले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या