धाराशिव जिल्ह्यातील छोट्याशा मौजे मेडशिंगा गावात जन्मलेले मनोज जाधव आज संपूर्ण महाराष्ट्रात "रुग्णसेवक" या शब्दाचा खरा अर्थ समजावणारे नाव ठरले आहेत. आजच्या काळात जेथे अनेक सेवा ही नफा-तोट्याच्या गणितावर अवलंबून आहे, तेथे मनोज जाधव हे निःस्वार्थपणे रुग्णसेवेत झोकून दिले आहेत.
त्यांचा एकच ध्यास – "सेवा हेच माझं कार्य". हजारो रुग्णांना त्यांनी वेळेवर मदत करून जीवनदान दिले आहे. कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, रुग्णासाठी आवश्यक कागदपत्रे, फॉर्म, सल्ले किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया – हे सर्व ते निशुल्क करतात.
मनोज जाधव यांचं मत अगदी स्पष्ट आहे –
"रुग्णासाठी तात्काळ व निशुल्क मदत करणे म्हणजेच खरी रुग्णसेवा".
संपूर्ण जिल्ह्यात कुठेही रुग्ण अडचणीत आला, की सगळ्यांच्या तोंडून एकच नाव निघते – "मनोज जाधव".
रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या मनात आश्वासक दिलासा देण्याचा कित्येक वेळा ते एकमेव आधार ठरले आहेत. प्रशासन, डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी आणि समाज यांच्यामधला योग्य समन्वय साधून अनेक गंभीर परिस्थिती त्यांनी सहज हाताळल्या आहेत.
त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल केवळ जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक लोक, संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांचं कौतुक करतात. परंतु मनोज जाधव कोणत्याही पुरस्काराच्या, प्रसिद्धीच्या मागे न लागता, आपलं कार्य शांतपणे करत राहतात.
"सेवा हीच खरी पूजा" हे तत्व अंगीकारलेल्या अशा रुग्णसेवकाला मानाचा मुजरा करावाच लागेल.
धाराशिव जिल्ह्याचा हा सुपुत्र खरंच एक आदर्श आहे – निस्वार्थ सेवाभावाचा, माणुसकीचा आणि जिद्दीचा.
मा.जुबेर शेख
मुख्य संपादक
वीर महाराष्ट्र न्यूज
0 टिप्पण्या