प्रतिनिधी: मुदस्सर शेख
लातुर: लोकशाहीला अबाधित ठेवत जनतेचे प्रश्न संवैधनिक मार्गाने सोडविण्यासाठी ए.आय.एम.आय.एम पक्ष संघटन मजबूत होणे गरजेचे असून त्यासाठी लातुर जिल्हा अध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख व शहर अध्यक्ष मुज़ीब हमदुले यांच्या हस्ते ए.आय.एम.आय.एम सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. हज़रत सूरत शाहवली (रह.) दरगाह येथून या मोहिमेला सुरुवात झाली.
ए.आय.एम.आय.एम लातूर शहराचे उपअध्यक्ष शेख सत्तार यांच्या नेतृत्वाखाली हे सदस्यता नोंदणी अभियान चालवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शेकडो जणांनी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले आणि पक्ष प्रमुख खा. बॅ. असदउद्दीन उवैसी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ए.आय.एम.आय.एम या पक्षात काम करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. तसेच प्रदेश अध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडतात त्याचेही अनेकांनी कौतुक केले होते. त्याच पावलावर पाऊल टाकत लातूरच्या तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ए.आय.एम.आय.एम लातुर जिल्हा अध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांना पाठबळ देण्यासाठी अनेकजण ए.आय.एम.आय.एम पक्षाची सदस्यता स्वीकारत आहेत. जनतेने टाकलेला हा विश्वास सार्थ करून दाखविण्याची भावना ॲड.मुहम्मदअली शेख यांनी व्यक्त केली. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. मात्र देशातच नव्हे तर राज्यातही मजबूत विरोधीपक्ष दिसून येत नाही. मजबूत विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची ताकद सद्या फक्त ए.आय.एम.आय.एम पक्षातच आहे. त्यामुळे जास्तीत संख्येने सुजाण नागरिकांनी ए.आय.एम.आय.एम पक्षाचे सदस्य होऊन पक्षाची ताकद मजबूत करावी, असे आवाहन ही ॲड.मुहम्मदअली शेख यांनी केले आहे.
सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी ए.आय.एम.आय.एम लातूर शहर उपाध्यक्ष शेख सत्तार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी कार्यकारी शहर अध्यक्ष लातुर जावेद पटेल, शेख जावेद, अहमद ख़ान पठान, तौहीद मुजावर, शाकेर क़ुरैशी, शेख इसहाक व अन्य आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या