प्रतिनिधी : प्रवीण मोरे
पुणेः पुणे येथील प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अनंत पांडुरंग काळे यांनी (दि.१६) रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांना पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष वेगाने वाढत असताना काही पदाधिकाऱ्यांच्या उलट सुलट कारणास्थानामुळे पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे व पक्षाचे प्रतिमा मलीन करण्याचे काम चालू आहे.
त्यामुळे पक्षांमध्ये कुठेही फूट पडू नये. यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा व शहर, पिंपरी चिंचवड, शहर, सर्व आघाडी, तालुका मतदारसंघ संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्हा बरखास्त झाल्यामुळे आ.बच्चू कडू यांना पुणे जिल्ह्यातून मोठा धक्का बसला आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुक व विधानसभा निवडणुकीसमोर हा मोठा धक्का आ.बच्चू कडू यांना बसला आहे.
संपूर्ण जिल्हा बरखास्त झाल्यामुळे काही कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वाटेवर असल्याचे चर्चा समोर येत आहे.
0 टिप्पण्या